Friday 11 March 2016

मानवी जीवनाच्या पृथःकरणास संख्याशास्त्राचा आधार शोधा: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांचे आवाहन



शिवाजी विद्यापीठात संख्याशास्त्र राष्ट्रीय परिषदेचे द्घाटन


कोल्हापूर, दि. ११ मार्च: संख्याशास्त्राच्या आधारे मानवी जीवनाचे पृथ:करण कसे करता येईल, यासाठी संख्याशास्त्राच्या संशोधकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठातील संख्याशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या द्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
      डॉ. शिंदे म्हणाले, मानवी जीवनातील प्रत्येक गोष्टीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करता येईल, अशी मला आशा वाटते. राष्ट्रीय विकासात संख्याशास्त्राचे योगदान मोठे आहे. सर्व प्रकारच्या संशोधनात संख्याशास्त्राचा उपयोग होतो.  माझ्या व्यक्तिगत संशोधनातही संख्याशास्त्राचे मोठे योगदान आहे. उत्तम विद्यार्थी घडविण्यात संख्याशास्त्र अधिविभाग आघाडीवर आहे. या अधिविभागातील पूर्वीचे चारही विभागप्रमुख परिषदेस उपस्थित आहेत, यावरून आजी माजी प्राध्यापकांमधील समन्वय दिसून येतो. या राष्ट्रीय परिषदेत एम.एस्सी.च्या विद्यार्थ्यांचा शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असणेही महत्त्वपूर्ण बाब आहे.
      परिषदेचे द्घाटक माजी विभागप्रमुख डॉ. एम. एस. प्रसाद म्हणाले, संख्याशास्त्राचे अनेक पैलू आहेत. या सर्व पैलूंचा अभ्यास या परिषदेच्या निमित्ताने होत आहे, ही अभिमानाची बाब आहे. आपण सुरू केलेल्या अधिविभागाचे यश पाहून समाधान वाटत असल्याची भावनाही डॉ. प्रसाद यांनी व्यक्त केल.
परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ. डी.टी. शिर्के यांनी प्रास्ताविक केले. रिझर्व्ह बँ ऑफ इंडियाचे माजी मुख्य सल्लागार परिषदेचे प्रमुख पाहुणे प्रा. डी.व्ही.एस. शास्त्री म्हणाले, अचूक संख्याशास्त्रीय मॉडेल वापरणे हे आपल्यासमोरचे आव्हान आहे. दैनंदि जीवनातील परिस्थिती संशोधन या मोठा फरक आहे. संशोधकांची दैनंदिन जीवनाची मोठी फारकत निर्माण झाली आहे.  दैनंदिन जीवनातील आव्हानांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे.
      संख्याशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. डी.एन. काशी यांनी अधिविभागाची माहिती दिली. डॉ. एस. बी. महाडि यांनी सूत्रसंचालन केले. परिषदेत बेंगलोर, मुंबई, मैस, हैद्राबाद, गुजरात, तमिळनाडू, सालेम, जळगाव, जालना, सोलापूर आदी ठिकाणच्या १४ विशेष वक्त्यांसह १४३ संशोधक सहभागी झाले आहेत.
--००--

No comments:

Post a Comment