Saturday 19 March 2016

ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज: डॉ. शेफाली पंड्या




कोल्हापूर, दि.19 मार्च: ज्ञानरचनावादी संशोधनाचे लाभ समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. शेफाली पंड्या यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'ज्ञानरचनावादी अध्यापन शास्त्रातील संशोधने प्रयोग' या विषयावरील दोन दिवसीय आंतरविद्याशाखी राष्ट्रीय परिषदे बीजभाषण करताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. डी.आर. मोरे होते, तर शिक्षण संहसंचालक डॉ. अजय साळी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. पंड्या म्हणाल्या, प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत ऱ्या अर्थाने ज्ञानरचनावाद आणावयाचा असेल तर दोन गोष्टींची नितांत गरज आहे. त्या म्हणजे प्रथम सर्वच शिक्षण स्तरावरील शिक्षकांचा परंपरावादी शैक्षणिक दृष्टिकोन बदलावा लागेल आणि त्याचबरोबर या क्षेत्रातील संशोधनांवर विशेषत: ज्ञानरचनावादी मूल्यमापनासंदर्भातील संशोधनांवर भर द्यावा लागेल. ज्ञानरचनावाद या विषयातील काही संशोधनेही त्यांनी सादर केली.
डॉ. डी.आर. मोरे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उच्च शिक्षणामध्ये ज्ञानरचनावाद कसा आणता येईल, याविषयी चर्चा केली.
शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिभा पाटणकर यांनी स्वागत केले, डॉ. एम. एस. पद्मिनी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. चेतना सोनकांबळे यांनी आभार मानले. श्रीमती सुषमा कोंडुसकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी डॉ. जी. एस. पाटील, डॉ. एन. आर. सप्रे, संशोधन विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थित होते.
परिषदेच्या दुसऱ्या सत्रा कुवेम्पु विद्यापीठ, शिमोगा (कर्नाटक) येथील शिक्षणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. एस. एस. पाटील यांनी ज्ञानरचनावादी अध्यापनशास्त्रासमोरील काही आव्हाने या विषयावर विचार मांडले. ज्ञानरचनावादी दृष्टीकोनाचा प्रत्यक्ष वापर करताना शिक्षक, अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष समाज आदी स्तरांवर अनेक आव्हाने आपल्यासमोर आहेत. त्यांची उत्तरे शोधणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
या परिषदेत महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यांतील विविध विद्यापीठांमधून शिक्षणप्रेमी, प्राथमिक माध्यमिक शिक्षक सहभागी झाले आहेत. या दोन दिवसांत सुमारे 50 शोधनिबंधाचे वाचन आणि चर्चा होणार आहे.

No comments:

Post a Comment