Wednesday 28 December 2016

स्थानिक राजकारणात महिलांची भूमिका निर्णायक

विद्यापीठातील महिला सरपंच कार्यशाळेत सूर




कोल्हापूर, दि. २८ डिसेंबर: स्थानिक राजकारणात महिला आता निर्णायक भूमिका बजावत असून स्थानिक राजकारणाचा अजेंडा त्यांनी बदलून टाकला आहे, असा सूर शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागात आयोजित महिला सरपंच व विद्यार्थी यांच्या कार्यशाळेप्रसंगी झालेल्या संवादात व्यक्त झाला. प्रा.डॉ. भारती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही कार्यशाळा झाली.
अधिविभागातर्फे 'महाराष्ट्राच्या राजकीय प्रक्रियेचा पुनर्विचार' या उपक्रमांतर्गत मंगळवारी (दि. २७) रंगलेल्या या संवाद कार्यक्रमात महिला सरपंचांनी त्यांच्या र्तृत्वाच्या आत्मकथा मांडल्या. यामधून महिला निर्णयकर्त्या आहेत, आणि त्यांनी स्थानिक राजकारणावर मोठा प्रभाव टाकला असून ही त्यांच्या सत्तासंघर्षाची चित्तवेधक कथा आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. महिला नेतृत्वाच्या जडणघडणीच्या अभ्यासाच्या दृष्टीने कार्यशाळा उपयुक्त ठरली.
कार्यशाळेमध्ये करवीर तालुक्यातील १५ महिला सरपंचांनी सहभाग घेतला. कार्यशाळे विभागप्रमुख प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनी मार्गदर्शन केले. प्रा. डॉ. भगवान माने प्रा. डॉ. रविंद्र भणगे यांनी चर्चा केली. संशोधक विद्यार्थी सचिन मरळे अजित डवरी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. कार्यशाळेसाठी विभागातील संशोधक विद्यार्थी प्राध्यापक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment