Wednesday, 23 August 2017

विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी

शिवाजी विद्यापीठाचा जिल्हा प्रशासनाशी सामंजस्य करार




कोल्हापूर दि. २३ ऑगस्ट: कोल्हापूर जिल्ह्यात विविध शासकीय योजना व उपक्रम विद्यार्थ्यांच्या सहभागातून राबविण्यासाठी शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूर जिल्हा प्रशासन यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला.
यावेळी कुलगुरु डॉ.देवानंद शिंदे, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्र-कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, प्रभारी वित्त लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
गेल्या शनिवारी (दि. १९) करण्यात आलेल्या या करारान्वये विविध शासकीय योजना, उपक्रम समाजाच्या तळागाळातील अंतिम घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तसेच जनजागृती करण्यासाठी संयुक्तपणे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा, प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांमधील कौशल्यांचा उपयोग करुन सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या विविध योजनांचा लाभ गतीने पोहचविण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम संयुक्तपणे केले जाईल, शी ग्वाही कुलगुरु डॉ. शिंदे यांनी दिली.
या सामंजस्य कराराचे कार्यक्षेत्र कोल्हापूर जिल्हयापुरते मर्यादित असून कराराचा कालावधी पाच वर्षांचा असणार आहे. जिल्हा प्रशासन व त्याअंतर्गत येणारे विविध प्रशासकीय विभाग यांच्यासोबत प्रसिद्धी, प्रचार, प्रशिक्षण, क्षेत्रीय सर्वेक्षण, नाविन्यपूर्ण उपक्रम, संशोधन, चर्चासत्रे, परिसंवाद, शिक्षक व विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध प्रकल्प संशोधनासाठी सहभाग, मनुष्यबळ संशोधन व विकास, उद्योजकता विकास उपक्रम, कौशल्य विकास, समूह विकास, जलयुक्त शिवार, मेक इन इंडिया, कॅशलेस इंडिया, जन-धन योजना, आर्थिक साक्षरता, स्वच्छ भारत अभियान, वनीकरण, रस्ते सुरक्षा योजना, खादी ग्रामोद्योग विकास, मतदार जागृती अभियान, बेटी बचाओ अभियान, डिजीटल इंडिया तसेच अन्य राष्ट्रीय उपक्रम इत्यादींसह इतर शासकीय व विद्यापीठीय उपक्रम संयुक्तपणे राबविण्यात येणार आहेत. यात वेळोवेळी शासनाकडून जाहीर करण्यात येणाऱ्या उपक्रम व योजनांचाही वेळोवेळी समावेश करण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे अध्ययन, अध्यापन, संशोधन आदींची जबाबदारी विद्यापीठाकडे असेल. या अंतर्गत जिल्ह्यातील तलाठी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सात-बारा व ई-चावडीबाबत माहिती व प्रशिक्षण देणार आहेत. त्याचप्रमाणे खरेदी प्रक्रिया व महाराष्ट्र राज्य सेवा नियमांबाबत जिल्हा कोषागार कार्यालयातील अधिकारी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांत ई-लर्निंग सुविधा निर्मिती करण्याच्या दृष्टीने शिक्षक प्रशिक्षण आणि विद्यार्थी अध्ययन विकास यांचे प्रशिक्षण विद्यापीठातील शिक्षक देतील. विद्यापीठाचा भूगोल अधिविभाग जिल्हाधिकारी कार्यालयाला जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांचे तंतोतंत जीपीएस टॅगिंग करण्यासाठी सहकार्य करणार आहे. या अनुषंगाने होणाऱ्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासन जिल्हा प्रशासन यांच्या स्वतंत्र समन्वय समिती गठीत करण्यात ल्या आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे आणि विद्यापीठाच्या वतीने प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले नोडल ऑफिसर म्हणून काम पाहात आहेत.

Tuesday, 22 August 2017

प्रतीसरकारमुळे ग्रामीण समुदायावरील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद - डॉ. अरुण भोसले यांचे प्रतिपादन


Dr. Arun Bhosale


कोल्हापूर, दि.22 ऑगस्ट: सर्वसामान्य ग्रामीण नागरिकांवरील अन्यायाविरुद्ध आवाज बुलंद करण्याचे कार्य प्रतीसरकारने केले, असे प्रतिपादन प्रा.डॉ.अरुण भोसले यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि जी.डी.बापू लाड प्रतिष्ठान, कुंडल यांच्या संयुक्त विद्यमाने मानव्यशास्त्र इमारतीच्या सभागृहामध्ये आयोजित जी.डी.बापू लाड आत्मकथन : एक संघर्ष यात्रा या विषयावरील एकदिवसीय कार्यशाळेमध्ये ते बोलत होते. क्रांती उद्योग आणि शिक्षण समुहाचे प्रमुख अरुणआण्णा लाड अध्यक्षस्थानी होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

डॉ. अरुण भोसले म्हणाले, कर्जमुक्त करणे, अन्याय, अत्याचार आणि भय नाहीसा करणे म्हणजे स्वातंत्र्य ही जी.डी. बापूंची भूमिका सामान्य माणसाला भावली होती. साताऱ्याचे प्रतीसरकार हा एक गौरवशाली अध्याय होता. याचे सूत्रसंचालक जी.डी.बापू लाड होते. कुपरशाही गुंड टोळ्यां निपटारा करण्याचे काम प्रतीसरकारने केल्यामुळे जनतेचा विश्वास दृढ होत गेला. प्रतीसरकारच्या कार्यामधून समाधानाची भावना निर्माण झाली. मुतालीक सरदार जमिनीचे कब्जेदार होते. त्यांच्याकडून जमिनीचे फेरवाटप करुन भूमीपिडीतांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. तसेच, न्यायनिवाड्यासाठी क्रांतीकारी पंचायतीची स्थापना केली. प्रतीसरकारची एक खडी फौज असली पाहिजे, यासाठी त्यांनी कुंडलमध्ये प्रशिक्षण दे तुफान दल तयार केले. सातारा जिल्ह्यातील तरुण पिढी, शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणात तुफान दलामध्ये सामील होत गेले. स्वातंत्र्य ढ्यामध्ये महात्मा गांधींनी सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक अशी परिवर्तनाची जोड दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळ व्यापक होत गेली. १९४२ साली सुरु झालेली छोडो भारत आंदोलन म्हणजे दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी होती. १९४२ ते १९४५ या काळामध्ये ही चळवळ सुरु झाली.

ते पुढे म्हणाले, भारता चार-पाच ठिकाणी प्रतीसरकारांची स्थापना झाली. त्यामध्ये उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील सातारा होते. पश्चिम बंगालमधील मिदनापू येथील प्रतीसरकार दीड वर्षे टिकले. तर सातारा येथील प्रतीसरकार तब्बल ४४ महिने कार्यरत होते. जी.डी. बापू लाड यांना क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मानसपुत्र म्हणता येईल. दोघांच्याही विचारांची नाळ घट्ट होती. तुफान सेनेचे फिल्ड मार्शल म्हणून जी.डी.बापू लाड यांनी काम केले. बहुसंख्य खेडेगांवांमध्ये क्य प्रस्थापित करण्याचे काम बापूंनी केले. यामुळे गावामध्ये क्य स्थापन करणे हा राष्ट्रीय कार्यक्रम झाला. 

कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर म्हणाले, जी.डी.बापू लाड जसे परखड होते, तसे प्रांजळही होते. सामान्य शेतकरी कुटुंबातील जी.डी.बापू यांनी केलेले कार्य आजच्या डिजीटल युगामधील तरुण पिढीला प्रेरणादायी आहे. 

Dr. Vilas Nandvadekar felicitating Shri. ArunAnna Lad at the workshop.
अध्यक्षीय भाषणात अरुणआण्णा लाड म्हणाले, १९४२ ची छोडो भारत ही चळवळ इस्लामपूर आणि तासगांव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाली. या काळात जी.डी. बापूंनी स्वातंत्र्य ढ्यासाठी तुफान सैनिकांची शाळा उभी केली. सर्वसामान्य लोकांना समाजकंटकांचा त्रास होत होता. या समाजकंटकांना धडा शिकविण्याचे कार्य बापू आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. त्यामुळे जनता सुखावून गेली. त्यांनी तरुणांसाठी उद्योगधंदे निर्माण करण्याचे कार्य केले. समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी, उद्योग व्यवसायासाठी त्यांनी केलेले कार्य फार मोलाचे आहे. 

यावेळी प्रा.डॉ.अशोक चौसाळकर, प्रसाद कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ.भारती पाटील यांनी स्वागत प्रास्ताविक केले. प्रा.केशव हरेल यांनी आभार मानले. यावेळी शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.