Showing posts with label Department of Technology. Show all posts
Showing posts with label Department of Technology. Show all posts

Friday, 2 December 2016

लर्न, अन-लर्न व रि-लर्न ही त्रिसूत्री शिक्षकांसाठी महत्त्वाची: डॉ. बी. एम. हिर्डेकर



Dr. B.M. Hirdekar at DoT orientation programme. In photo also seen Dr. A.K. Sahoo, Dr. J.S. Bagi and Dr. P.D. Patil.
शिवाजी विद्यापीठात शिक्षकांसाठी ओरिएंटेशन प्रोग्रॅमला प्रारंभ
  कोल्हापूर, दि. २ डिसेंबर: बदलत्या शिक्षणप्रवाहात टिकण्यासाठी शिक्षकांनी संशोधनावर लक्ष केंद्रित करून समाजाचे प्रश्न सोडवताना लर्न, अन-लर्न व रि-लर्न या त्रिसूत्रीचा अवलंब करणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा.(डॉ.) बी. एम. हिर्डेकर यांनी आज येथे केले. शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागात शिक्षकांसाठी आयोजित चार आठवड्यांच्या ओरिएंटेशन प्रोग्रॅमच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. जयदीप बागी अध्यक्षस्थानी होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, नवीन पिढीचे विद्यार्थी स्मार्ट असून प्राध्यापकांनी देखील आता स्मार्ट झाले पाहिजे. जगात टिकण्याकरिता शिक्षण हाच एकमेव मार्ग असून त्याकरिता सातत्याने ज्ञानलालसा जागृत ठेवली पाहिजे. सातत्यपूर्ण निरंतर शिक्षणाचा अवलंब करून नाविन्यपूर्ण संशोधनाचा वापर समाजातले प्रश्न सोडविण्याकरिता करावा. लर्निंग सर्कल्स स्थापन करून विद्यार्थी व शिक्षकांनी नवीन ज्ञान निर्माण केले पाहिजे. शिक्षण क्षेत्र डेडिकेशन, कमिटमेंट व डिव्होशन या तीन मूल्यांवर आधारित असल्याने जगाला प्रभावित करण्याचे सामर्थ्य शिक्षण क्षेत्रात पर्यायाने शिक्षकांच्यात आहे. मात्र त्यासाठी शिक्षकांनी आपल्या प्रगतीचा आलेख चढता ठेवावा, असा सल्ला त्यांनी या प्रसंगी दिला.
तंत्रज्ञान आधिविभागाने हा ओरिएन्टेशन प्रोग्रॅम विद्यापीठात आयोजित करून प्राध्यापकांना पदोन्नतीसाठी संधी निर्माण करून दिली, या पुढाकाराचेही डॉ. हिर्डेकर यांनी कौतुक केले.
डॉ. बागी यांनी शिक्षकी पेशा पवित्र आहेच, पण तो तितकाच कठीण व जवाबदारीचा असल्याने शिक्षकांनी स्वतःला अद्ययावत ठेवणे गरजेचे असल्याचे अध्यक्षीय मनोगतात सांगितले. या ओरिएन्टेशन प्रोग्रॅममध्ये मार्गदर्सन करणाऱ्या सुमारे चाळीस दिग्गजांच्या अनुभवाचा शिक्षकांनी लाभ करून घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
समन्वयक डॉ. पी. डी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. इराण्णा उडचाण यांनी परिचय करून दिला. प्रशासकीय समन्वयक प्रा. (डॉ.) ए. के. साहू यांनी आभार मानले. यावेळी पर्यावरण अभ्यासक मिलिंद पगारे, समन्वयक यांच्यासह विविध महाविद्यालयांचे ५० हून अधिक शिक्षक उपस्थित होते. २९ डिसेंबरला या उपक्रमाचा समारोप होईल.

चार आठवड्यांचा भरगच्च उपक्रम
या ओरिएंटेशन प्रोग्रॅमला विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता असून तो चार आठवडे चालणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मनुष्यबळ विकास केंद्राद्वारे शिवाजी विद्यापीठातील तंत्रज्ञान अधिविभागात याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यापीठातील अधिविभागांतील तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांसाठी स्वतंत्रपणे कोर्स तयार केला असून हे सत्र २९ डिसेंबरपर्यंत चालेल. उच्च शिक्षणातील संशोधन व त्या अनुषंगाने येणारे महत्वाचे विषय, नैतिकता, पर्यावरण, प्राध्यापकांच्या सेवेच्या अनुषंगाने येणारे विविध मुद्दे, आंतरशाखीय संशोधन, कायदाविषयक जागरूकता, संशोधन पद्धती, संवाद कौशल्ये, माहिती तंत्रज्ञानाचा वापर, सूक्ष्म अध्यापन या व अशा अनेक विषयांवर त्या त्या विषयांतील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Thursday, 19 May 2016

'आयजीटीआर'च्या सहकार्याने औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविणार : कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे




शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्यात सामंजस्य करार

कोल्हापूर दि. 17 मे: इंडो जर्मन टूल रुम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्ह्यांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरविण्याचे प्रयत्न सामंजस्य कराराच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील आयजीटीआर या संस्थेमध्ये झालेल्या सामंजस्य करार प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बीसीयुडी संचालक डॉ.डी.आर.मोरे, प्र.कुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ.अजित थेटे, डॉ.अजित थेटे, डॉ.जी.एस.कुलकर्णी, गोपाळ बेलूरकर आदी उपस्थित होते.
कुलगुरु डॉ. शिंदे म्हणाले, भविष्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठामध्ये उभारले जाणार आहे. आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठीचे आवश्यक ते शिक्षण विद्यापीठामध्ये दिले जाईल. त्याचे प्रशिक्षण आयजीटीआर, औरंगाबाद येथे विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षकांनाही दिले जाणार आहे. उद्योग व्यवस्थेनेही कोणत्या क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे विशद करणे आवश्यक आहे. यासाठी उद्योजकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होईल.
          इंडो जर्मन टूल रुम औरंगाबादचे व्यवस्थापकीय संचालक हेमंत कापसे यांनी अभियांत्रिकी महाविद्यालयांचे प्राचार्य उद्योजक यांना आयजीटीआर, औरंगाबाद या संस्थेचे कार्य प्रेझेंटेशनद्वारे सादर केले. हेमंत कापसे पुढे म्हणाले, उद्योग क्षेत्रास कुशल मनुष्यबळ पुरविणे हा या कराराचा एक भाग असून उद्योगक्षेत्रामध्ये नवतंत्रज्ञानामुळे सातत्याने होणारे बदल हे तळागाळातील लोकांपर्यंत आवश्यकतेप्रमाणे पोहचविण्याचे कार्य केले जाईल. आयजीटीआरचे केंद्र तसेच विद्यापीठातील संशोधकांसाठी औरंगाबाद येथे प्रगत संशोधनाची सोय उपलब्ध होणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयजीटीआर, औरंगाबाद यांच्या एकत्रित प्रयत्नातून येथील विद्यार्थ्यांना विविध तंत्रकौशल्य आत्मसात करण्याच्या संधी उपलब्ध होणार आहे. तसेच, या प्रयत्नातून उद्योगांच्या आवश्यकतेप्रमाणे कमी कालावधीचे सर्टिफिकेट कोर्सेस प्रशिक्षणार्थींना उपलब्ध होणार आहे.
           या वेळी अनेक उद्योजकांनी कुशल प्रशिक्षणार्थीची अत्यंत निकड असल्याचे सांगून संबंधि विषयांवर चर्चा केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योग तंत्रसंस्था आंतर क्रिया कक्षाचे समन्वयक हर्षवर्धन पंडित यांनी केले. तर आभार मेकॅनिकल इंजिनिअरींगचे समन्वयक अजित कोळेकर यांनी मानले. या प्रसंगी विविध अभियांत्रिकी विभागाचे समन्वयक, शिक्षक उद्योजक उपस्थित होते.