Showing posts with label Dr. Rajan Gavas. Show all posts
Showing posts with label Dr. Rajan Gavas. Show all posts

Friday, 18 February 2022

समकालीन समीक्षकांत डॉ. वसंत पाटणकर यांचे स्थान महत्त्वाचे: डॉ. गणेश देवी

 

शिवाजी विद्यापीठात डॉ. वसंत पाटणकर यांना म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार-२०२२ प्रदान करताना डॉ. गणेश देवी व कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, कवयित्री नीरजा, डॉ. राजन गवस, सौ. सरोज पाटणकर, रंगनथ पाठारे, डॉ. व्ही.एन. शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे.


डॉ. म.सु. पाटील पुरस्काराचे शिवाजी विद्यापीठात वितरण

 

कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: सैद्धांतिक वैचारि मांडणीचा परामर्ष घेता समकालीन समीक्षकांमध्ये डॉ.वसंत पाटणकर यांचे स्थान अत्यंत महत्वाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.गणेश देवी यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाच्या वतीने राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात डॉ. म.सु. पाटील समीक्षा पुरस्कार २०२२ मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ.वसंत पाटणकर यांना प्रदान करताना डॉ. देवी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.  

डॉ. गणेश देवी म्हणाले, वितेचे कवीपण नेमके कशामध्ये आहे, याचा शोध डॉ.वसंत पाटणकर सातत्याने घेत आले आहेत. डॉ. म.सु. पाटील यांच्या नावच्या पुरस्काराने त्यांच्या या गुणविशेषावर विद्यापीठीय शिक्कामोर्तब झाले आहे. विचारांच्या बांधणीचे एकत्रिकरण करण्याची अद्भ कला डॉ.पाटील यांना अवगत होती, याचेही स्मरण या निमित्ताने केले पाहिजे.  

या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठात उपस्थित राहता येत असल्याचा आनंद खूप मोठा असल्याचेही डॉ. देवी यांनी सांगितले. ते म्हणाले, माझी चांगल्या अर्थाने घरवापसी घडून आली. या विद्यापीठामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने घडलो. घडण्याची प्रेरणा विद्यापीठाच्या या सिनेट सभागृहानेच दिली. या प्रेरणेमुळेच अमेरिका, इंग्लंड येथील विद्यापीठांमध्ये शिकवू शकलो.

पुरस्काराला उत्तर देताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वसंत पाटणकर म्हणाले, शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला प्राप्त होत असलेल्या पुरस्काराचा खूप आनंद होत आहे. डॉ.म.सु.पाटील यांच्याशी माझे फार जवळचे संबंध होते. शिवाजी विद्यापीठ आणि कोल्हापूरकारांकडून मला नेहमीच सन्मान लाभलेला आहे.  वेगवेगळया प्रकारची समीक्षा लिहिलेली आहे.  मुख्यत: काव्यसमीक्षा माझ्या लेखनाचा केंद्रबिंदू राहिलेली आहे. विता आणि समीक्षा माणसाची आत्मिक भूक भागवत असते. समीक्षा करताना पळवाट स्विकारता कामा नये. लेखन करणे ही स्वत:ला एका प्रकारे मुक्त करण्याची प्रक्रिया आहे.  दीर्घकाळ साचून राहिलेले, निचरा झालेले, बांधून टाकणारे, बंदीस्त असणारे या ठिकाणी मोकळे होते, प्रवाही होते.  हा एका अर्थाने स्वतंत्र्याचा आनंद मानता येईल.

अध्यक्षीय मनोगता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, डॉ. म.सु. पाटील पुरस्कार प्रदान करण्यासाठी डॉ.गणेश देवी यांच्यासारख्या विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यास आमंत्रित केले, याचा एक वेगळा आनंद आहे. त्याचप्रमाणे मान्यवर साहित्यिकांची मांदियाळी या निमित्ताने विद्यापीठाच्या प्रांगणात अवतरली आहे, ही बाबही समाधान देणारी आहे.

यावेळी, ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार रंगनाथ पठारे आणि ज्येष्ठ कवयित्री नीरजा यांनी मनोगत व्यक्त केले. ज्येष्ठ समीक्षक प्रा.अविनाश सप्रे आणि मौज प्रकाशनच्या लेखिका संपाद मोनिका गजेंद्रगडकर यांच्या शुभेच्छा संदेशाच्या चित्रफित दाखविण्यात आल्या. 

याप्रसंगी, प्रतिभा कणेकर यांच्या कवयित्रींची सर्जनशीलता आणि म.सु.पाटील यांच्या साहित्यसमीक्षा - सिध्दांत आणि व्यवहार या समीक्षाग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. 

यावेळी पुरस्कारप्राप्त डॉ.वसंत पाटणकर यांचा डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते सपत्निक सत्कार झाला. पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, ५१ हजार रूपये,  सन्मानचिन्ह आणि मानपत्र असे आहे. यावेळी डॉ. गणेश देवी यांचाही कुलगुरूंच्या हस्ते सपत्निक सत्कार झाला.

याप्रसंगी डॉ.किरण गुरव, सोनाली नवांगुळ, डॉ. अक्षय सरवदे यांचा अनुक्रमे साहित्य अकादमी नरहरी कुरूंदकर पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल डॉ.गणेश देवी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ.रणधीर शिंदे प्रास्ताविक केले. डॉ.नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. राजेश पाटील यांनी डॉ.पाटणकर यांना देण्यात आलेल्या मानपत्राचे वाचन केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी एकनाथ पगारे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस, डॉ. म.सु. पाटील यांचे कुटुंबीय यांच्यासह विद्यार्थी, विद्यार्थिनी, शिक्षक, संशोधक उपस्थित होते.