Showing posts with label M.I.T.. Show all posts
Showing posts with label M.I.T.. Show all posts

Tuesday, 26 April 2016

लोकशाहीच्या प्रगल्भतेमध्ये मतदारांची कळीची भूमिका: प्रा. परिमल




 
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना एम.आय.टी.चे आशिष लाल. व्यासपीठावर प्रा.डॉ.वासंती रासम, प्रा.डॉ.प्रकाश पवार, प्रा.परिमल माया सुधाकर, मनिष केळकर प्रा. कल्पना दीक्षित.

कोल्हापूर, दि. २६ एप्रिल: भारतीय निवडणूक प्रक्रियेत मतदार हे सातत्याने कळीची भूमिका बजावतात. त्यांच्या जागरुकतेमुळेच निवडणुकांचा कौल दरवेळी वेगळा असला तरी लोकशाही प्रगल्भ बनविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे, असे प्रतिपादन प्रा. परिमल माया सुधाकर यांनी आज येथे केले.
एम.आय.टी. पुणे, शिवाजी विद्यापीठाचा राज्यशास्त्र आधिविभाग तसेच श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'भारतातील सद्य:राजकीय परिस्थिती आणि उदयोन्मुख संधी' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आज पार पडली. या परिषदेत ते बोलत होते.
'भारतातील निवडणूक, राजकारणाचे बदलते स्वरुप' या विषयावर बोलताना प्रा. परिमल म्हणाले, भारतातील निवडणुकांमध्ये सातत्य, स्थिरता नसून ती सातत्याने मतदाराच्या कौलावर अवलंबून असतात. केंद्रीय पातळीवरील निवडणका प्रादेशिक पातळीवरील निवडणुकांचा कौल वेगवेगळा असतो. याचा अर्थ मतदारांत संभ्रम आहे, असा नाही; तर, प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या परिस्थितीची आणि त्याठिकाणी आवश्यक असणाऱ्या नेतृत्वाबद्दल त्याच्या अपेक्षांची, आशाआकांक्षांची त्यांना जाणीव आहे. हेच यातून अधोरेखित होते. त्यामुळेच भारताला जगातील सर्वात मोठी लोकशाही मानले जाते. मतदार जागरुक असून वेळोवेळी योग्य त्या पक्षाला त्यांनी पाठिंबा दिल्याचे दिसून येते.
प्रा. वासंती रासम म्हणाल्या, भारताच्या राजकारणाचे स्वरुप झपाटयाने बदलत असल्यामुळे हिल्यांदा मतदान करणाऱ्या युवकांची संख्या वाढत आहे. तसेच निवडणुकांमध्ये समाज माध्यमाचा वापर मोठया प्रमाणात होत असून निवडणूक प्रक्रिया व्यावसायिकांकडून हाताळली जात आहेत. अशा परिस्थितीमध्ये सामाजिकशास्त्र, विधी, व्यवस्थापन शास्त्राच्या विद्यार्थ्यांना या निवडणूक प्रक्रियांमध्ये होणाऱ्या बदलांचा उपयोग आपल्या करिअरसाठी हो शकतो.
दुसऱ्या सत्रामध्ये राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख प्रा. प्रकाश पवार यांनी पश्चिम बंगाल, केरळ, तमिळनाडू, पाँडिचेरी या चार राज्यांतील निवडणुकीच्या अनुषंगाने राजकीय सामाजीकरण, इतिहास, संस्कृती, आणि बदलत्या राजकीय वातावरणासंदर्भात विश्लेषण केले. दक्षिण राज्यांमध्ये भाजप हिंदुत्ववादावर नव्हे, तर आर्थिक विकासावर भर देत असल्यामुळे बहुमत नाही मिळाले, तरी मताची टक्केवारी वाढण्याची शक्यता त्यांनी व्यक्ती केली.
प्रा. मनिष केळकर यांच्या मते, निवडणुकांमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्यशास्त्र सामाजिक शास्त्रांतील विद्यार्थ्यांना या निवडणुकींच्या बदलत्या स्वरुपामुळे अनेक रोजगार संधी उपलब्ध होतील. राजकीय नेतृत्व, राजकीय विश्लेषक, राजकीय सल्लागार, प्रचार सभा संयोजक, निवडणूक कार्यक्रम आयोजक, वैयक्तिक सल्लागार, निवडणुकीचे व्हेंट मॅनेजमें शा अनेक संधी उदयोन्मुख युवकांना उपलब्ध असल्याचे सांगितले.
या कार्यशाळेच्या सुरवातीला एम.आय.टी.च्या आशिष लाल यांनी स्वागत केले. डॉ. रविंद्र भणगे यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठ परिसरातील सामाजिकशास्त्र, वाणिज्य व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षक विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.