Saturday 4 August 2018

जलविज्ञान शास्त्रात संशोधनाची मोठी संधी: प्रा.व्यंकटेश मेरवाडे

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठाचे प्रा. व्यंकटेश मेरवाडे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. विद्या चौगुले, डॉ. सचिन पन्हाळकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. पी.टी. पाटील.
 
कोल्हापूर, दि. ऑगस्ट: जलविज्ञानाचे शास्त्र उन्नत करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी याकडे संधी म्हणून पाहिली पाहिजे. आपत्ती टाळण्यासाठी पूरग्रस्त भागाचे नकाशे अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करणे अत्यंत निकडीचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या र्ड्यू विद्यापीठातील प्रा.व्यंकटेश मेरवाडे यांनी आज येथे केले.
Prof. Vyankatesh Merwade
शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'भौगोलिक माहिती प्रणालीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन' या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहा आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या द्घाटन प्रसंगी प्रा.मेरवाडे बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी डेहराडून येथील स्रोचे शास्त्रज्ञ भास्कर निकम, तमिळनाडूच्या चेन्नई विद्यापीठातील डॉ.सुलोचना शेखर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. मेरवाडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन या जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था तसेच विशेषज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. नैसर्गिक आपत्तींमुळे अमेरिकला प्रतिवर्षी सहा अब्ज रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातही मोठ्या प्रमाणात हानी होते. हे टाळण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. राचे अचूक पूर्वानुमान लावण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. अमेरिके फेडरल इमर्जनसी या संस्थेकडून राबाबत माहिती घेतली जाते. भारता येणाऱ्या रांचे अथवा पावसाचे योग्य अंदाज बांधून येथील गटारींचे, नाल्यांचे व्यवस्थापन मजबूत करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्याकडे पडणाऱ्या पावसाच्या नोंदी संबंधित संस्थेस कळविल्यास भविष्यामधील मोठी हानी टाळता येणे शक्य आहे. 
ProVC Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, नैसर्गि आपत्ती टाळण्यासाठी पुढच्या अनेक वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. जिओइन्फर्मेटीक्स तंत्रज्ञानाच्या सहाययाने पूरजन्य परिस्थिती योग्य नियोजनाने हाताळणे शक्य आहे. शिक्षणाच्या पारंपरिक पदधतीच्या पलीकडे जा वेगवेगळ्या सॉफटवेअरच्या माध्यमातून संशोधनात्मक शिक्षण घे विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी पाळणे आवश्यक आहे.
सुरवातीला कार्यशाळेच्या द्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते अधिविभागातील विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये कौशल्य प्राप्त होण्यासाठी तीस टॅबचे वितरण करण्यात आले. भूगोल अधिविभागप्रमुख डॉ.सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी.टी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.  प्रा.विद्या अजित चौगुले यांनी आभार मानले, तर डॉ. एम.बी. पोतदार यांनी सूचसंचालन केले. यावेळी श्री.मुस्तफा, डॉ. सी.टी. पवार, डॉ. एस.बी. देशमुख, डॉ.रमोत्रा, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. पी.के. दत्ता यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून आलेले तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment