Thursday 2 August 2018

शेतीच्या बळावर मोठ्या प्रमाणात कार्बन क्रेडिट्स मिळविणे शक्य: कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे


 
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. पी.डी. राऊत, डॉ. गिरीश राऊत, डॉ. डी.आर. मोरे, रघुनाथदादा पाटील, डॉ. विलास नांदवडेकर, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. प्रणाली राऊत.





VC Dr. Devanand Shinde
कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट - भारत हा शेतीप्रधान देश असून शेतीच्या बळावर देशाला मोठ्या प्रमाणावर कार्बन क्रेडिट्स मिळविणे शक्य आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग आणि शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'कार्बन क्रेडि आणि जल व्यवस्थापन' या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या द्घाटनप्रसंगी कुलगुरू डॉ. शिंदे बोलत होते. विद्यापीठाच्या भाषा भवन सभागृहामध्ये आयोजित कार्यशाळे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्री. रघुनाथदादा पाटील, विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, मानवाने औद्योगिकीकरणाला सुरूवात केल्यापासून निसर्गाच्या साधनसंपत्तीच्या रक्षणाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त झाले आहे. औद्योगिकरणास सुरूवात करणाऱ्या विकसित राष्ट्रांनी याची जबाबदारी घेतली नाही. त्यामुळे ही जबाबदारी विकसनशील देशांकडे आली. यामधून जागतिक प्रदूषण कमी करण्याचा विचार पुढे आला. या प्रदुषण कमी करण्याच्या प्रक्रियेस कार्बन क्रेडीट म्हणतात. विविध उद्योगधंदे इतर माध्यमातून कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण अधिक झाल्याने ते साठवणूक करण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. जास्तीत जास्त द्धतीने शेतीमध्ये हे करता येणे शक्य आहे. यामुळे वातावरणातील कार्बनचा भार कमी होणार आहे. शेतकरी कशाप्रकारे कार्बन साठवणूक करतो, त्याचे मूल्यमापन कसे करणार, यासाठी ही कार्यशाळा उपयुक्त ठरणार आहे.
कुलगुरू पुढे म्हणाले, एक लीटर पाणी वापरत असताना त्यातून चार ते पाच लीटर सांडपाणी आपण तयार करतो. पिण्याच्या पाण्याचा अपव्य टाळणे ही एक सामाजिक जबाबदारी आहे. जनजागृतीतून शेतीच्या पाण्याचे सुयोग्य व्यवस्थापन करणे ही आता गरज बनली आहे. त्याचप्रमाणे शेतकरी आणि ग्रामीण भाग हे संस्कारांचा वारसा जपणारे मोठे केंद्र आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आई-वडील वृद्धाश्रमात दिसत नाहीत, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
Raghunath Dada Patil
यावेळी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील म्हणाले, शेतकरी हा खरा संशोधक आहे. शेतीच्या माध्यमातून अन्नधान्यांच्या विविध वाणांचा प्रयोगांती शोध लावून पिकविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत असतो. शेतकऱ्यांनी लावलेल्या कोट्यवधी झाडांचे पर्यावरणीय मूल्य मिळणार असेल तर शेतकरी आत्महत्या थांबण्यास ते उपयुक्तच ठरेल. पिकांच्या माध्यमातून शेतकरी शेतीला पाणी देतो, म्हणजेच तो पृथ्वीचे तापमान कमी करण्यास बहुमोल सहकार्य करीत असतो. देशातील विविध भागांमध्ये उपलब्ध परिस्थितीत शेतीच्या माध्यमातून देश जगविण्याचे महत्वाचे कार्य तो करतो.
याप्रसंगी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पर्यावरणशास्त्र अधिविभागप्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत यांनी प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर यांनी आभार मानले. यावेळी अधिष्ठाता डॉ. पी.एस. पाटील, डॉ.बालेखान मुजावर, डॉ.गिरीष राऊत, डॉ.प्रणाली राऊत, डॉ. ए.डी. जाधव यांचेसह सोलापूर, पंढरपूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, बी आदी राज्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

No comments:

Post a Comment