Thursday 16 August 2018

शिवाजी विद्यापीठात स्वातंत्र्यदिन उत्साहात



कोल्हापूर, दि. १६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात भारतीय स्वातंत्र्य दिन काल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, अधिष्ठाता डॉ. पी.डी. राऊत, डॉ. पी.एस. पाटील, डॉ. ए.एम. गुरव, डॉ. भारती पाटील, इनोव्हेशन व इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. आर.के. कामत, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, क्रीडा अधिविभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह शिक्षण, प्रशासकीय अधिकारी व सेवक तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Friday 10 August 2018

सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला हॉकिंग चमत्कार - डॉ.सुभाष देसाई


कोल्हापूर, 10 ऑगस्ट - सैध्दांतिक भौतिक विज्ञानामधला स्टिफन हॉकिंग चमत्कार आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉ.सुभाष देसाई यांनी केले.

            शिवाजी विद्यापीठाच्या ' रिसर्च कोलेक्युअम' मार्फत आयोजित जगद्विख्यात शास्त्रज्ञ स्टिफन हॉकिंग यांच्या ' ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम' या पुस्तकाचे डॉ.सुभाष देसाई यांंनी मराठीमध्ये अनुवादीत केलेल्या 'कालाचा संक्षिप्त इतिहास' या पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते झाले.  त्यावेळी डॉ.देसाई बोलत होते.  विद्यापीठाच्या रसायनशास्त्र सभागृहामध्ये झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे होते.

डॉ.सुभाष देसाई पुढे म्हणाले, ज्ञानाला एक नवीन दिशा देणारे पुस्तक आहे. अतिशय सुलभ सोपी मांडणी असून यामध्ये गणितीय मांडणी केलेली नाही. या पुस्तकामध्ये हॉकिंग यांनी निरनिराळया शास्त्रांचा अभ्यास करून मांडणी केलेली आहे.  समाज जीवनावर काळ या विषयाचे वेगवेगळे प्रभाव पडत असतात.  सर्व शास्त्रज्ञांनी नव विश्वाचे चित्र उभे केले यामध्ये स्टिफन हॉकिंग यांचा दर्जा फार मोठा आहे.  ही पृथ्वी ठिसूळ आहे त्यामुळे अणुस्फोट करणे थांबवा, मानवजात जीवंत ठेवायची असेल तर अंतराळामध्ये पृथ्वी सदृश्य ग्रह शोधा, असे हॉकिंग यांनी शास्त्रज्ञांना सांगितले होते. तत्वज्ञान विज्ञान या दोन्ही क्षेत्रांत मन ही संकल्पना खोलवर रूजलेली आहे.  मन हे आभासी तर मेंदू हे वास्तव हे द्वैत पाळणे लोकांना अवघड जाते.  मानसशास्त्र भक्कम वैज्ञानिक पाया अभावी अन्य विज्ञान शास्त्रांइतके वृध्दिंगत झाले नाही. जीवनाच्या विविध अंगावर मानसशास्त्राचा पडलेला प्रभाव नाकारता येत नाही.  विज्ञानाची कास धरल्याखेरीज रूढी परंपरांची जळमटे निघून जाणार नाहीत.  नवतंत्रज्ञानाच्या प्रवाहात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी त्यामध्ये करिअर करावे. तंत्रज्ञानाचा वापर बहुजन हिताय, बहुजन सुखाय असावा.
आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे म्हणाले, हॉकिंग यांचा ग्रंथ हा वैज्ञानिक खरा, पण तो केवळ विज्ञानाच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनीच वाचावा आणि इतरांनी वर्ज्य करावा, असा नाही.  जगातल्या प्रत्येक नागरिकाने हा ग्रंथ वाचला पाहिजे.  विज्ञानाचा ग्रंथ असला तरी त्याची भाषा, त्यामधील परिभाषा इतकी सुगम, सुबोध आहे की, कोणाही व्यक्तीला त्या सहजपणाने समजतील. मूळ ग्रंथातील ही सुगमता डॉ.देसार्‌इंनीही त्यांच्या ग्रंथामध्ये कौशल्याने उतरविली आहे.
डॉ.एस.डी.डेलेकर प्रास्ताविक केले. डॉ.पी.एम.माने यांनी परिचय करून दिला.  डॉ.पी.बी.माने यांनी आभार मानले.  यावेळी रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ.जी.एस.गोसावी, डॉ.सी.ए.लंगरे यांचेसह विविध विभागातील प्राध्यापक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थींनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----


Thursday 9 August 2018

शिवाजी विद्यापीठात क्रांतीवीरांना अभिवादन



   क्रांतीदिनानिमित्त विद्यापीठातील क्रांतीवनातील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र वाहून अभिवादन करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे. शेजारी  प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर,  डॉ.डी.आर.मोरे,  डॉ.डी.के.गायकवाड,  डॉ.आर.व्ही.गुरवडॉ.डी.एन.काशीदडॉ..एम.गुरवउपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे आदी.

कोल्हापूर
, दि.9 ऑगस्ट - देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या शहीदांना आज क्रांतीदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले. आज सकाळी कुलगुरू डॉ.देवानंद शिंदे यांच्या हस्ते विद्यापीठाच्या गेट क्रमांक आठ येथील क्रांतीवनामधील स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्र-कुलगुरु डॉ.डी.टी.शिर्के, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त लेखाधिकारी श्री.व्ही.टी.पाटील, शैक्षणिक सल्लागार डॉ.डी.आर.मोरे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.आर.व्ही.गुरव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे समन्वयक डॉ.डी.के.गायकवाड, अधिष्ठाता डॉ.भारती पाटील, डॉ.ए.एम.गुरव, डॉ.वैशाली भोसले, डॉ.डी.एन.काशिद, डॉ.पी.टी.गायकवाड, डॉ.के.डी.सोनवणे, उपकुलसचिव डॉ.व्ही.एन.शिंदे, उपकुलसचिव विलास सोयम, उपकुलसचिव डॉ.पी.एस.पांडव यांच्यासह विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.
-----


Wednesday 8 August 2018

‘वायूप्रदूषण मापनासाठी स्टार रेटींग उपयुक्त’

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी इन्स्टिट्यूटचे ईशान चौधरी. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. सागर डेळेकर, प्रशांत गायकवाड, उदय गायकवाड व डॉ. पी.डी. राऊत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत उपस्थितांचे शंकासमाधान करताना मान्यवर.


कोल्हापूर, दि. ८ ऑगस्ट: संपूर्ण जग आज विविध पर्यावरणीय प्रश्नांना सामोरे जात आहे. वायू प्रदूषण हा सध्या अत्यंत कळीचा मुद्दा बनला आहे. वाढते औद्योगिकीकरण, वाहतूक आणि इतर कारणांमुळे होणारे इंधनाचे ज्वलन हे वायू प्रदूषण वाढविणारे महत्वाचे घटक आहेत. यामुळे होणाऱ्या वायू प्रदूषकांच्या उत्सर्जनाची माहिती सामान्य नागरिकाला व्हावी, या दृष्टीने शिकागो विद्यापीठाच्या एनर्जी पॉलिसी या संस्थेने महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मदतीने “स्टार रेटिंग प्रोग्राम” ही वायू प्रदूषण मूल्यमापन प्रणाली उपयोगात आणली आहे. ही प्रणाली सर्वसामान्यांना माहितीच्या दृष्टीने उपयुक्त आणि आवश्यक आहे, असा सूर आज शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत उमटला.
स्टार रेटिंग प्रणालीची माहिती करून देण्याच्या उद्दिष्टाने शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, विद्यापीठ व उद्योग संवाद केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि शिकागो विद्यापीठाची एनर्जी पॉलिसी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
स्टार रेटींग प्रोग्रॅमची माहिती देताना ईशान चौधरी म्हणाले, उद्योगांमधून किती वायू प्रदूषण होते, ते सर्वसामान्यांना सहज सोप्या पद्धतीने कळावे, हा या प्रकल्पाचा प्रमुख उद्देश आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश्य लोकसहभागच आहे. आज याच्याशी महाराष्ट्रातील २६० उद्योग जोडलेले आहेत. या उद्योगांतून बाहेर पडणाऱ्या कण स्वरूपातील प्रदूषकांची माहिती mpcb.info या वेबसाईटवर दिसणार आहे. जो उद्योग अधिक प्रदूषण करतो त्याला एक स्टार आणि जो त्याहून कमी प्रदूषण करतो, त्याला त्या प्रमाणात पाचपर्यंत स्टार या पद्धतीने कणस्वरूपातील प्रदूषकांच्या प्रमाणावर रेटींग ठरणार आहे. एखाद्या उद्योगातून प्रदूषण होत असल्याची तक्रार येईल, त्या उद्योगाशी थेट संवाद साधण्यासाठीही या उपक्रमाचा व्यासपीठ म्हणून उपयोग होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.
पर्यावरणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. पी.डी. राऊत यांनी पर्यावरणशास्त्र विभाग हा सर्व पर्यावरणविषयक घटकांचे मूल्यमापन करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे व सोयींनी सुसज्ज असल्याचे यावेळी सांगितले. ते म्हणाले, पर्यावरणशास्त्र विभागात केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत राष्ट्रीय परिवेश वायू गुणवत्ता निरीक्षणाचा प्रकल्प २००४ पासून यशस्वीपणे राबवला जात असून यामध्ये नायट्रोजनचे ऑक्साईड्स, सल्फरचे ऑक्साईड्स, धुलीकण यांचे मोजमाप केले जाते. कोल्हापूरमध्ये शिवाजी विद्यापीठ, दाभोलकर कॉर्नर, महाद्वार रोड या तीन ठिकाणी हवेचे मापन केले जाते. अलिकडील वर्षात काही ठिकाणी हवेची गुणवत्ता ढासळत असल्याचे दिसत आहे. असे प्रदूषण कमी करण्यासाठी शहराच्या काही भागांत हरित उर्जेचा वापर, शहरात नो व्हेईकल, नो वे, नो पार्किंग झोन करणे तसेच इंधनातील भेसळ थांबविणे, फटाके उडविण्यास बंदी करणे असे उपाय आवश्यक आहेत. यासाठी जाणीव जागृती करणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कोल्हापूर विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड म्हणाले, उद्योग आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामधील माहितीची गॅप या उपक्रमामधून दूर करता येणे शक्य आहे. वायू प्रदुषणाचा विचार करताना त्या परिसरातील भौगोलिक आणि वातावरणीय परिस्थितींचा हवा प्रदूषकावर परिणाम होतो हे लक्षात घेतले पाहिजे. तसेच उद्योगांनी या स्टार रेटींग प्रोग्रॅममध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उदय गायकवाड यांनी कोल्हापूरमधील वायू प्रदुषणाच्या कारणांचा ऊहापोह केला. ते म्हणाले, कोल्हापूर शहरातील वायू प्रदुषणाचा विचार करताना रेल्वे, बस आणि इंधनातील भेसळीमुळे होणाऱ्या प्रदूषणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. चौकांमधील सिग्नलला टाईमर नसणे, उद्योगातील इंधनासाठी होणारी वृक्षतोड यामुळे होणारे वायू प्रदूषण देखील घातक आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय होणे गरजेचे आहे.
यावेळी प्रश्नोत्तरांमध्ये वेबसाईटवर उपलब्ध होणाऱ्या माहितीकडे नागरिकांनी डोळसपणे पहिले पाहिजे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या उद्योग व विद्यापीठ संवाद केंद्राचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी आभार मानले. या कार्यशाळेस डॉ. आसावरी जाधव, डॉ. निलीशा देसाई, डॉ. पल्लवी भोसले, डॉ.सोनल चोंदे यांच्यासह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे श्री. कडले, श्री. मोरे, विविध उद्योगांचे प्रतिनिधी, संशोधक  विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday 4 August 2018

जलविज्ञान शास्त्रात संशोधनाची मोठी संधी: प्रा.व्यंकटेश मेरवाडे

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात बोलताना अमेरिकेच्या पर्ड्यू विद्यापीठाचे प्रा. व्यंकटेश मेरवाडे. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. विद्या चौगुले, डॉ. सचिन पन्हाळकर, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, डॉ. पी.टी. पाटील.
 
कोल्हापूर, दि. ऑगस्ट: जलविज्ञानाचे शास्त्र उन्नत करण्यासाठी संशोधक विद्यार्थ्यांनी याकडे संधी म्हणून पाहिली पाहिजे. आपत्ती टाळण्यासाठी पूरग्रस्त भागाचे नकाशे अद्यावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार करणे अत्यंत निकडीचे आहे, असे प्रतिपादन अमेरिकेच्या र्ड्यू विद्यापीठातील प्रा.व्यंकटेश मेरवाडे यांनी आज येथे केले.
Prof. Vyankatesh Merwade
शिवाजी विद्यापीठातील भूगोल अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'भौगोलिक माहिती प्रणालीच्या सहाय्याने आपत्ती व्यवस्थापन' या विषयावर विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहा आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या द्घाटन प्रसंगी प्रा.मेरवाडे बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के अध्यक्षस्थानी होते. यावेळी डेहराडून येथील स्रोचे शास्त्रज्ञ भास्कर निकम, तमिळनाडूच्या चेन्नई विद्यापीठातील डॉ.सुलोचना शेखर यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रा. मेरवाडे म्हणाले, आपत्ती व्यवस्थापन या जागतिक समस्येचे निराकरण करण्यासाठी सरकारी संस्था तसेच विशेषज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. नैसर्गिक आपत्तींमुळे अमेरिकला प्रतिवर्षी सहा अब्ज रूपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. नैसर्गिक आपत्तींमुळे भारतातही मोठ्या प्रमाणात हानी होते. हे टाळण्यासाठी नवतंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्ण उपयोग करणे आवश्यक आहे. राचे अचूक पूर्वानुमान लावण्यासाठी यंत्रणा सक्षम करणे गरजेचे आहे. अमेरिके फेडरल इमर्जनसी या संस्थेकडून राबाबत माहिती घेतली जाते. भारता येणाऱ्या रांचे अथवा पावसाचे योग्य अंदाज बांधून येथील गटारींचे, नाल्यांचे व्यवस्थापन मजबूत करणे आवश्यक आहे. सर्वसामान्य नागरिकांनीही आपल्याकडे पडणाऱ्या पावसाच्या नोंदी संबंधित संस्थेस कळविल्यास भविष्यामधील मोठी हानी टाळता येणे शक्य आहे. 
ProVC Dr. D.T. Shirke
अध्यक्षीय भाषणा प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, नैसर्गि आपत्ती टाळण्यासाठी पुढच्या अनेक वर्षांचा विचार करून नियोजन करणे आवश्यक आहे. जिओइन्फर्मेटीक्स तंत्रज्ञानाच्या सहाययाने पूरजन्य परिस्थिती योग्य नियोजनाने हाताळणे शक्य आहे. शिक्षणाच्या पारंपरिक पदधतीच्या पलीकडे जा वेगवेगळ्या सॉफटवेअरच्या माध्यमातून संशोधनात्मक शिक्षण घे विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारी पाळणे आवश्यक आहे.
सुरवातीला कार्यशाळेच्या द्घाटनानंतर मान्यवरांच्या हस्ते अधिविभागातील विद्यार्थ्यांना संशोधनामध्ये कौशल्य प्राप्त होण्यासाठी तीस टॅबचे वितरण करण्यात आले. भूगोल अधिविभागप्रमुख डॉ.सचिन पन्हाळकर यांनी प्रास्ताविक केले. डॉ. पी.टी. पाटील यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.  प्रा.विद्या अजित चौगुले यांनी आभार मानले, तर डॉ. एम.बी. पोतदार यांनी सूचसंचालन केले. यावेळी श्री.मुस्तफा, डॉ. सी.टी. पवार, डॉ. एस.बी. देशमुख, डॉ.रमोत्रा, उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, डॉ. पी.के. दत्ता यांच्यासह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा येथून आलेले तज्ज्ञ, संशोधक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.