Friday 13 January 2017

जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शैक्षणिक प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल आवश्यक: डॉ.आदिनारायण कलानिधी






कोल्हापूर, दि.१३ जानेवारी: जागतिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी देशाच्या शैक्षणिक प्रणालीमध्ये आमुलाग्र बदल आवश्यक आहे. शिक्षणतज्ज्ञांनी, धोरणकर्त्यांनी समयसुचकता राखून शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन चेन्नईच्या आण्णा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.आदिनारायण कलानिधी यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठ के.आय.टी.चे अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'नॅक पुरस्कृत मूल्यांकन परीक्षणाचा उच्च शैक्षणिक संस्थावर होणारा परिणाम' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या द्घाटन प्रसंगी बीजभाषण करताना डॉ.कलानिधी बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे होते.
डॉ. कलानिधी म्हणाले, आज शिक्षण क्षेत्रासह विविध उद्योग-व्यवसायांत कार्यरत असणाऱ्यांनी काळानुरुप बदलत्या अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. अभ्यासक्रम आणि शैक्षणिक प्रणालीमध्ये बदल करणे हे आपल्या यंत्रणेपुढील मोठे व्हा आहे. आधुनिकतेची कास धरताना आपल्याला प्रथम शिक्षण द्धती बदलण्याबरोबरच जुन्या झालेल्या अभ्यासक्रमांचे सभोवतालच्या उद्योगांशी सुसंगत असे आधुनिकीकरण करणे आवश्यक आहे. आपल्याकडील रीचशी महाविद्यालये आणि विद्यापीठे शासनाच्या अनुदानावर अवलंबून असल्यामुळे मोठया संकटात सापडलेली आहेत. विद्यार्थ्यांना नोकऱ्या उपलब्ध होत नसल्यामुळे महाविद्यालयां शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण घटत आहे.
ते म्हणाले, भारत सरकार नॅकच्या माध्यमातून देशभरातील विद्यापीठांचे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करीत आहे. या माध्यमातून आपणाला विद्यापीठांमध्ये तसेच महाविद्यालयांमध्ये उच्च गुणवत्ता प्राप्तीसाठी होत असलेले प्रयत्न लक्षात येतात. यामुळे शैक्षणिक केंद्रांना समाजा चांगला लौकिक प्राप्त होतो. विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देणाऱ्या उत्तम दर्जाच्या शिक्षकांची आज मोठी गरज निर्माण झालेली आहे.
      बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या आधारावर विद्यार्थ्यांच्या रोजगाराचे प्रमाण ठरते.  त्यामुळे शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी नवतंत्रज्ञान सातत्याने आत्मसात करणे आवश्यक आहे. विद्यापीठांची प्रतिष्ठा महाविद्यालयांच्या प्रतिष्ठेवर अवलंबून असते; तसेच, विद्यापीठाच्या शिक्षणाचा दर्जा हा महाविद्यलयांच्या शैक्षणिक दर्जवर अवलंबून असतो.
यावेळी के.आय.टी.चे सचिव साजिद हुदली यांनी मनोगत व्यक्त केले. विद्यापीठाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. आर.के. कामत यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य डॉ. व्ही.व्ही. कार्जिनी यांनी परिषदेच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. के.आय.टी.चे उपप्राचार्य डॉ. एम.एम. मुजुमदार यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा.एस.एस. माने यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठासह के.आय.टी. अभियांत्रिकी महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment