Thursday 12 January 2017

शिक्षणातूनच सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान: डॉ. पी. कन्नान



विद्यापीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय चर्चासत्रास प्रारंभ

 
शिवाजी विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात स्मरणिकेचे प्रकाशन करताना डॉ. पी. कन्नान. सोबत अर्थशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. पी.एस. कांबळे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, डॉ. जे.एफ. पाटील, डॉ. बसवराज बन्नी आदी.


कोल्हापूर, दि.१२ जानेवारी: शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान करणे शक्य असते आणि त्यातूनच जागतिक परिवर्तन घडवून आणता येते, असे प्रतिपादन विजापूर (कर्नाटक) येथील राज्य महिला विद्यापीठाचे इंग्रजी अधिविभागप्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे संचालक प्रा.डॉ. पी. कन्नान यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 'आधुनिक भारताच्या विकासात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाची प्रस्तुतता' या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रास आजपासून सुरवात झाली. या चर्चासत्राचे बीजभाषण करताना डॉ. कन्नान बोलत होते. अर्थशास्त्र अधिविभागाच्या सभागृहात झालेल्या या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी बीसीयुडी संचालक तथा प्रभारी कुलगुरु डॉ. डी.आर. मोरे होते.
डॉ. पी. कन्नान
डॉ. कन्नान म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनाचे विविध प्रवाह समजून घेण्याकरिता आयुष्यातील बहुतेक वेळ विद्याभ्यासात घालविला. आणि त्यातूनच परिवर्तनासाठी शिक्षणाच्या माध्यमातून समाजाचे सबलीकरण करणे ही महत्त्वाची गरज असल्याचे त्यांचे मत बनले होते. बाबासाहेबांनी आपल्या लिखाणातून भारताच्या खऱ्या सामाजिक इतिहासावर प्रकाशझोत टाला आहे. बिनतोड युक्तीवादांसह त्यांनी केलेल्या सैद्धांतिक मांडणीला आजही पर्याय नाही. पूर्वीच्या काळी सर्वांना शिक्षण घेणे शक्य नव्हते अशा विषमतेच्या परिस्थितीत त्यांनी केलेले सामाजिक, आर्थिक न्यायावरील कार्य फार महान आहे. ठरा-ठरा तास अभ्यास करणारे सर्जनशील वाचक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाई. अर्थशास्त्राच्या प्रत्येक शाखेत त्यांनी केलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे. 
अध्यक्षीय भाषणा डॉ. डी.आर. मोरे म्हणाले, ज्ञानाची ताकद काय असते, हे जगाला बाबासाहेबांनी आपल्या कार्यातून दाखवून दिले. संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक नागरिकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झाला. त्यामुळे समाजा खंबीरपणे उभे राहण्यासाठी शिक्षण हे एकमेव स्रो आहे, हे लक्षात घेऊन राज्य केंद्र सरकार सातत्याने पुढाकार घे प्रयत्न करीत आहेत.
यावेळी अर्थशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ.पी.एस.कांबळे यांनी प्रास्ताविक केले.  डॉ.व्ही.पी.कट्टी यांनी त्रसंचालन केले. समन्वयक एस.टी. कोंबडे यांनी आभार मानले. यावेळी बल्लारी विद्यापीठाचे बसवराज एस. बन्नी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ.जे.एफ. पाटील, डी.एम. भंडारी, डॉ. प्रविण के. जाधव, डॉ.आर.जी. दांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. चर्चासत्रास विविध राज्यांतील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment