Monday 16 October 2017

स्थानिक पदार्थांच्या जागतिक मार्केटिंगसाठी

तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रयत्न आवश्यक: गिरीष चितळे


Mr. Girish Chitale inaugurating the workshop


Mr. Chitale expressing his views at the workshop, while (from left) Dr. Jaydeep Bagi, Pratap Puranik, Yogesh Kulkarni, Mrs. Pallavi Korgaonkar and Dr. A.K. Sahoo look on.


कोल्हापूर, दि.16 ऑक्टोबर: तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्थानिक पदार्थांचे जागतिक पातळीवर मार्केटींग करण्यासाठी विद्यार्थ्यांनी संशोधनात्मक प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन चितळे डेअरीचे कार्यकारी संचालक गिरीष चितळे यांनी केले.
वर्ल्ड फूड डेच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठाचा तंत्रज्ञान अधिविभाग सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने 'अन्न प्रक्रीया उद्योगात व्यवसायाची संधी' या विषयावर विशेष चर्चासत्र आज येथे झाले. या चर्चासत्राच्या द्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. चितळे बोलत होते. विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीआयआयच्या दक्षिण महाराष्ट्र झोनचे अध्यक्ष योगेश कुलकर्णी होते.
Girish Chitale
श्री. चितळे म्हणाले, आज देशामध्ये बारा ते पंधरा टक्के वाटा हा अन्न प्रक्रिया उद्योगाचा आहे. यामुळे या क्षेत्रामध्ये तरुणांना अनेक प्रकारच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. संशोधक विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करुन मालाच्या किंमती कमी करणे गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत राहण्याची आवश्यकता आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये विविध प्रकारच्या स्वयंचलि उपकरणांची प्रचंड निकड आहे. कडधान्य, पालेभाज्या, फळे हे आपल्याच देशातील लोकसंख्येला पुरत नाहीत. बऱ्याच ठिकाणी ते पोहोचत नाहीत किंवा खरेदी करता येत नाहीत.  त्यासाठी प्रक्रिया उद्योग पुढे येत आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन, त्यावरील प्रक्रिया आणि मार्केटिं यांचा योग्य ताळमेळ जमल्यास या क्षेत्रामधील तरुणांना प्रचंड उभारी मिळेल
ते पुढे म्हणाले, जीवन साखळीतील अन्न हा सर्वात महत्वाचा घटक आहे. आज आपल्याला प्रक्रिया केलेले अन्न लागते कारण आपण निसर्गापासून लांब झालेलो आहोत. उत्तम आरोग्यासाठी प्रक्रिया केलेले अन्न कमी प्रमाणात खावे. आजचा शेतकरी हा स्वयंपूर्ण नाही. त्याला इतरांवर अवलंबून राहवे लागते. पूर्वी सत्तर ते ऐंशी टक्के इतक्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे धान्य शेतकरी स्वत: पिकवित असे. आज तसे होताना दिसत नाही. 
लोकांच्या बदलत्या गरजांमध्ये संधी शोधता आली पाहिजे, असे युवा संशोधकांना आवाहन करून श्री. चितळे म्हणाले,  भारतातील लोकांच्या खाण्याच्या गरजा बदलत नाहीत, द्धती बदलत आहेत. मोठी झेप घेण्यासाठी छोटया छोटया गोष्टींमधील गॅप पाहायला हवा आणि त्या संधी निर्माण करता आली पाहिजे. मालाची गुणवत्ता टिकविणे, साठवणूक आणि वाहतूक करणे यामध्ये प्रचंड संधी निर्माण झालेली आहे. विद्यापीठ आणि उद्योग यांचे समन्वयाने विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होवू शकते. भारतातील प्रत्येक छोटा व्यापारी आणि उद्योजक हा स्वत:च स्टार्टअप आहे. हे छोटे व्यापारी दोन-तीन वर्षानंतर व्यवस्थापक ठेवून व्यापार पुढे वाढविण्यासाठी प्रयत्न करीत नाहीत. त्यामुळे सत्तर ते ऐंशी टक्के स्टार्टअप संपून जातात. फुड सेफ्टीमध्ये स्वच्छताविषयक जागृती वाढविणे हे जागति पातळीवर टिकण्यासाठी निकडीचे आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
पल्लवी कोरगांवकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. यावेळी तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ.जे.एस. बागी, डॉ.ए.के. साहू, प्रताप नाईक, उपकुलसचिव डॉ. जी.एस. कुलकर्णी आणि तंत्रज्ञान अधिविभागातील संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment