Thursday 29 November 2018

यशवंतराव चव्हाण यांना कुलगुरूंकडून आदरांजली

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाला भेट देऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आदरांजली वाहिली.


ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाला भेट देऊन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आदरांजली वाहिली.

कऱ्हाड येथील प्रितीसंगम परिसरातील समाधीस्थळाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.

कोल्हापूर, दि. २९ नोव्हेंबर: प्रितीसंगम हे केवळ कृष्णा-कोयनेच्या संगमाचे ठिकाण नसून या संगमात यशवंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्तृत्वाचाही प्रवाह येऊन मिळाल्याने याला पवित्र त्रिवेणी संगमाचे स्वरुप प्राप्त झाले आहे, अशा शब्दांत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्राचे शिल्पकार व ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी गेल्या रविवारी (ता. २६) कऱ्हाड येथील प्रितीसंगमावरील समाधीस्थळास भेट देऊन आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. समाधीस्थळ परिसरात कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काही काळ व्यतित केला आणि उपस्थितांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, यशवंतरावांनी अत्यंत द्रष्टेपणाने महाराष्ट्राच्या विकासाची दिशा आखली. त्यांनी आखून दिलेल्या रोडमॅपनुसार धोरणकर्त्यांनी वाटचाल केल्यामुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा विकास अधिक गतीने झाल्याचे दिसून येते. राज्याचा शैक्षणिक, औद्योगिक तसेच इतर विविध क्षेत्रांत विकास झाला. येथून पुढेही आपण त्याच दिशेने वाटचाल करीत गेल्यास प्रगतीच्या नव्या दिशा गवसतील, असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी प्रा. बाळासाहेब गोफणे यांच्यासह विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment