Saturday 16 July 2022

वैज्ञानिक माहितीची जोड लाभल्यास रेशीमशेतीच्या उत्पादनात वाढ: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेचे उद्घाटन करताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. सोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेत बोलताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील. सोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेतील सहभागी शेतकऱ्यांसमवेत चर्चा करताना प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटीलसोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागांतर्गत रेशीमशास्त्र कार्यशाळेतील सहभागी शेतकऱ्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटीलसोबत डॉ. आर. के. कामतडॉ. ए. डी. जाधवडॉ. आशिष देशमुख आदी.


शेतकऱ्यांसाठी प्राणीशास्त्र विभागात रेशीमशास्त्रविषयक कार्यशाळा

कोल्हापूर, दि. १६ जुलै: रेशीम शेती करणारे राज्यभरातील शेतकरी कौशल्यप्राप्तीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागात शिक्षण घेतात. या शेतकऱ्यांनी प्रवेश घेतलाच, परंतु यशस्वीपणे परीक्षाही दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी शिवाजी विद्यापीठाच्या प्रयत्नांना मिळत असलेली ही पोचपावती आहे. शेतकरी हुशार असतोच, मात्र त्याला विज्ञानाची जोड मिळाल्यास रेशीम शेती उत्पादन आणि गुणवत्तेत नक्कीच वाढ होईल, असे प्रतिपादन प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी आज सकाळी येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र विभागाच्या सेंटर ऑफ एक्सन्स ॲन्ड इनक्युबेशन इन सेरिकल्चर यांच्या वतीने निलांबरी सभागृहात एकदिवसीय राज्यस्तरीय 'रेशीम शास्त्र कौशल्य तंत्रज्ञान' कार्यशाळा आज आयोजित करण्यात आली. यावेळी कार्यसाळेचे उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. राज्यातील बारा जिल्ह्यांतील ५०हून अधिक शेतकरी कार्यशाळेसाठी उपस्थित होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलले असून तो अधिक स्वावलंबी व स्वाभिमानी बनला आहे. शेतकरी शास्त्रज्ञ झाला पाहिजे. त्यासाठी लागणारे ज्ञान देण्यास शिवाजी विद्यापीठ तत्पर आहे. चंद्रपूरपासून ते सिंधुदुर्गपर्यंतचे शेतकरी कार्यशाळेला उपस्थित आहेत, ही महत्त्वाची व उत्साहवर्धक बाब आहे. येथे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याची तसेच स्वत:चा रेशीम शेतीमधील आत्मविश्वास वाढविण्याची तळमळ दिसून येते. शेतकऱ्यांच्या हितासाठी विद्यापीठामार्फत विविध संकल्पना आणि योजना उपलब्ध करून देण्याचा आमचा यापुढेही प्रयत्न राहील.

यावेळी अभियंते दामोदर पांढरे, प्राणीशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. शिष देशमुख यांनीही मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत रेशीम शेती, अंडीपुंज निर्मिती, धागा निर्मिती, रेशीम शेती सेवा केंद्र अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. उस्मानाबादचे बापू नहाने, राधानगरी तालुक्यातील दीपक शेट्टी, सांगोला येथील विष्णू काशीद, पुणे येथील विजय गारगोटे यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. ए. डी. जाधव यांनी कार्यशाळेचे समन्वयक म्हणून काम पाहिले. यावेळी विज्ञान तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर. के. कामत, कृषी विभागाचे उपसंचालक रविंद्र फाटक आदी उपस्थित होते.

 


No comments:

Post a Comment