Wednesday 31 January 2018

शारदाबाई पवार यांचे पुणे लोकल बोर्डावरील कार्य आदर्शवत: डॉ. एन.डी. पाटील



शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कै. श्रीमती शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. एन.डी. पाटील. सोबत डावीकडून डॉ. भारती पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोजताई पाटील, सौ. विजया पाटील.
बुबनाळच्या सरपंच आस्मा जमादार यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.



कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: कै.श्रीमती शारदाबाई पवार यांचे पुणे लोकल बोर्डावर सामाजिक जाणिवेच्या भावनेतून केलेले कार्य आदर्शवत स्वरुपाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.एन.डी.पाटील यांनी केले. 
शिवाजी विद्यापीठाच्या कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या छ.शाहू सिनेट सभागृहामध्ये 'स्थानिक राजकारणातील स्त्रिया : काल आज' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यशाळेच्या द्घाटन प्रसंगी 'शारदाबाई गोविंदराव पवार यांचे व्यक्तित्व पुणे लोकल बोर्डातील कार्य' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे बीजभाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  सौ.सरोजताई पाटील, सौ.विजया पाटील, बुबनाळच्या सरपंच सौ.आस्मा जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
Dr. N.D. Patil
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, १९३८ साली शारदाबाई पुणे लोकल बोर्डावर निवडून गेल्या. या बोर्डाच्या त्या चौदा वर्षे सदस्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेकांना चांगल्या सामाजिक कामासाठी प्रोत्साहन दिले. लोकल बोर्डाच्या धोरणावर त्यांच्या कार्याचा चांगला ठसा उमटला. अस्पृश्यता निवारणाचे प्रश्न, सामाजि कार्य, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.  १९३८ ते १९५२ सालापर्यंत लोकल बोर्डाच्या सभागृहावर त्यांच्या कार्यर्तृत्वाचा आणि सामाजिक जीवनाचा मोठा प्रभाव होता.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, शारदाबाई पवार यांना आयुष्या सातत्याने अडथळ्यांच्या शर्यतीतू जावे लागले.  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वळीवडे या छोट्या खेडेगावा त्यांचा जन्म झाला. शारदाबाई पवार या अतिशय र्तृत्ववान व्यक्तीमत्वाच्या होत्या. संसाराचा गाडा अतिशय समर्थपणे निभावताना मुला-मुलींना उच्चशिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यांनी कधीही मुलगा, मुलगी असा भेदाभेद केला नाही. मुलींना जीवनाभिमु शिक्षण मिळावे, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्या धडपडत होत्या. शारदाबाईंनी पुण्या शिक्षणासाठी न्यायमूर्ती रानडे यांच्या सेवासदनमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी सर्व प्रकारचे कौशल्य त्यांना मिळाले. पवार कुटुंबामध्ये आल्यानंतर मूर्तीमंत जिद्द बाळगून आलेल्या आणि त्यामध्ये आपले जीवन व्यति करणाऱ्या शारदाबाई यांच्या जिद्दीमुळेच मला वकीलीची सनद काढणे शक्य झाले. शारदाबाई आणि गोविंदराव पवार दोघेही कर्तबगार होते. शारदाबाई पवार यांची ओळख केवळ शरद पवारांची आई अशी करुन देणे म्हणजे त्यांच्या अफाट कर्तृत्वावर अन्याय केल्यासारखे होईल. मुलांच्या जडणघडणीत त्यांनी जातीपातीचा कोणताही स्पर्श हो दिला नाही, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगता कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन हे मातृशक्ती, स्त्रीशक्तीचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्र आहे. १९३८ साली कै.श्रीमती शारदाबाई पवार सामाजिक क्षेत्रा आल्या. त्यावेळी सामाजिक, आर्थिक, मानसिक पातळीवर संघर्ष करीत असताना शारदाबाईंनी मोठ्या दूरदृष्टीने प्रशासकीय कामकाज केले. येणाऱ्या काळा प्रशासनाती स्त्रियांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे. समाजातील विविध क्षेत्रा परिवर्तन आणावयाचे असेल तर स्त्रियांचा कृतीशील सहभाग असणे आवश्यक आहे. स्त्रीही ज्ञानपीठ असते. हे ज्ञान अनुभवातून मिळविलेले असते. अंतिमत: संस्कारातून आपले मूल या देशाचे एक सक्षम विचार करणारे जबाबदार नागरिक व्हावे, या हेतूने त्या कार्यरत असतात.
यावेळी बुबनाळ येथील महिला ग्रामपंचायतीच्या सरपंच आस्मा जमादार, उपसरपंच सोनाली शहापुरे यांच्यासह सर्व सदस्य महिलांचा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रमही यावेळी झाला.
अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. शीतल भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर कविता ड्राळे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment