Friday 28 January 2022

भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठात कवी संमेलन

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन कवीसंमेलनात कविता सादर करताना प्रफुल्ल शिलेदार. शेजारी सहभागी कवी.

कविता सादर करताना सुप्रसिद्ध कवी सौमित्र तथा किशोर कदम.


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठातील मराठीइतिहासराज्यशास्त्र ज्ञानमंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आज (दि. २८) आभासी माध्यमाद्वारे कवी संमेलन संपन्न झाले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉडीटीशिर्के यांनी कवी संमेलनाचे उद्घाटन केलेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्राराजा दिक्षित यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्याया कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारच्या गोवा राज्यातील कवीही सहभागी झाले

कवी प्रफुल्ल शिलेदारकिशोर कदम ऊर्फ सौमित्रमीनाक्षी पाटीलरमेश इंगळे-उत्रादकरप्रज्ञा दया पवारमनोज बोरगावकरसंदिप जगदाळेजयप्रभू कांबळेश्रीधर तिवळेकवयित्री नीरजा आदींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले संमेलनाचे सूत्रसंचालन कवी गोविंद काजरेकर यांनी केलेसर्वच कवींनी वर्तमानाला भिडणाऱ्यामानवी जीवनदर्शन घडविणाऱ्या, समकाळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या.

ज्येष्ठ कवयित्री निरजा यांनी कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविलेसमकाळातील कवी साहित्यिक आणि कलाकार यांच्या सांस्कृतिक जबाबदरीचा तसेच वर्तमान स्थितीतील सांस्कृतिक राजकारणाचा परखड परामर्श घेतला, तसेच कवितांचेही वाचन केले संमेलनाचे प्रास्ताविक मराठी अधिविभाग प्रमुख डॉरणधीर शिंदे केलेविश्वकोश निर्मिती मंडळाकडून डॉजगतानंद भटकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर  सुस्मिता खुटाळे यांनी आभार मानले.

 

No comments:

Post a Comment