Thursday 3 March 2016

प्रत्येक मनुष्यात विचारांचे वैविध्यपूर्ण उद्यान: कुलगुरु प्रा.डॉ.देवानंद शिंदे




कोल्हापूर दि. मार्च: प्रत्येक मनुष्या विचारांचे वैविध्यपूर्ण उद्यान असते. त्या विचारांचे प्रयत्नपूर्वक ज्ञानात रुपांतर करून कृतीशीलपणे ते प्रत्यक्षात आणले पाहिजेत, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाचा वनस्पतीशास्त्र अधिविभाग, गार्डन्स क्लब, इंडियन वूमन सायंटिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने 'उद्यान आणि विज्ञान' या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या द्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  वनस्पतीशास्त्र अधिविभागाच्या निलांबरी सभागृहा कार्यशाळा झाली.
 
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, प्रत्येक क्षेत्रामध्ये विज्ञान आहे. लिड बॉटॅनिकल गार्डनच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठासारखे मोठे मंच उपलब्ध झाले आहे. त्यामुळे मुलांना काही क्षण निसर्गाच्या सान्निध्यात राहून जैवविविधितेची माहिती घेणे शक्य झाले आहे. या कार्यशाळेमधील कल्पकता घेवून प्रत्येक मुलाने घरी उद्यान बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. उद्याने आपल्यासाठी आदर्श मार्गदर्शक ठरु शकतात. वेगवेगळ्या समाजातील प्रश्नांना उद्याने मर्पक उत्तरे दे शकतात. उद्यानामध्ये वनस्पती समन्वयाने फुलतात, तर मानवी सहजीवन परस्पर समन्वयातून का फुलू शकणार नाही, अशी शिकवण उद्याने देतात.

यावेळी सामाजिक वनीकरण उपसंचालक टी.पी.पाटील, डॉ. मंजुषा देशपांडे, विजयसिंह सावंत व डॉ. एस.आर. यादव यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कोल्हापूर विभागातील चार तारांकित शाळांचा, चार ग्री सोल्जर्सचा सत्कार करण्यात आला. जिल्हयातील ५० निवडक शाळांतील हरित सेना, विद्यार्थी शिक्षक शा २०० जणांनी सहभाग घेतला. पर्यावरण समस्येवर मात करण्यासाठी अनेक उपायांची जगभर होणारी चर्चा वैज्ञानिक हरित प्रयोग दिवसभराच्या व्याख्यानातून चर्चिले गेले. यावेळी सौ.शौमिका महाडिक, डॉ.धनश्री पाटील उपस्थित होत्या. 'टेरारियम' दे मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी उद्यान आणि विज्ञान पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. डॉ.धनश्री पाटील, अध्यक्ष, गार्डन क्लब यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे समन्वयन सौ.कल्पना सावंत, अध्यक्षा, इंडियन वुमन सायंटीस्ट असोसिएशन यांनी केले.

No comments:

Post a Comment