Monday 28 March 2022

निव्वळ शून्य उत्सर्जनासाठी भरीव प्रयत्नांची आवश्यकता: प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील

 

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) कर्नल शशिकांत दळवी, नितीन डोईफोडे, डॉ. सुभाष आठल्येडॉ. मधुकर बाचुळकरकमलाकर बुरांडे व प्रा. मगर आदी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत डॉ. सुभाष आठल्येडॉ. मधुकर बाचुळकरकर्नल शशिकांत दळवी, डॉ.राजन पडवळ आदी.

शिवाजी विद्यापीठात निव्वळ शून्य उत्सर्जनाबाबत कार्यशाळा

कोल्हापूर, दि. २८ मार्च: निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करण्यासाठी आज जगभरात विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकारचे प्रयत्न स्थानिक पातळीवरही भरीव प्रमाणात व्हायला हवेत. त्यांना शिवाजी विद्यापीठाचे सर्वोतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाचे बँक ऑफ इंडिया अध्यासन आणि राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात नेट झिरो एमिशन: ए ग्लोबल नेसेसिटी" या विषयावर एक दिवसीय व्यवस्थापन विकास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, झिरो कार्बन आणि नेट झिरो एमिशन अशा अनेक संज्ञांनी सामान्य माणूस व कार्यकर्त्यांच्या मना कुतूहल निर्माण केलेले आहे. खऱ्या अर्थाने यासंदर्भातील काम नेटाने पुढे नेण्यासाठी काही कार्यकर्ते स्वतःहून समाजा या विषयावर भरपूर काम  करत आहेत. समाजातील अशा वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना एकत्रित करून या विषयाला अग्रस्थानी आणण्याचे उद्दिष्ट या कार्यशाळेच्या माध्यमातून साध्य झाले आहे. अशा पद्धतीच्या प्रबोधनात्मक चर्चा सातत्याने घडवून आणल्या जाणे आवश्यक आहे. त्यातून समाजाला या विषयांचे गांभिर्य लक्षात येईल, या दिशेने प्रयत्न व्हायला हवेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

ग्लासगो परिषदेत झालेल्या चर्चेनुसार सन २०७०पर्यंत नेट झिरो एमिशन साध्य करण्यासाठी काय करावे लागेल, या दृष्टीने डॉ. सुभाष आठल्ये, डॉ. मधुकर बाचुळकर व कर्नल शशीकांत दळवी या तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. नागरिकांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही, तर नजीकच्या काळात तापमानवाढीचे गंभीर दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतील. वारंवार होणारी चक्रीवादळे, अवकाळी पाऊस, ओला व सुका दुष्काळ आणि पाण्याचे दुर्भिक्ष्य अशी संकटे येत राहतील आणि मानवच त्याला कारणीभूत असेल, असा सूर या चर्चेत उमटला.

कार्यक्रमात सुरवातीला चेअर प्रोफेसर डॉ. राजन पडवळ यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील भूमिका विद केली. विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी कार्यशाळेचे उद्घाटन केले.

यावेळी विश्व वन्यजीव निधीचे सुहास वायंगणकर, ग्राहक प्रबोधन प्रचार प्रांत समिती प्रमुख सचिन जंगम, श्री. बुरांडे, दिनकर चौगुले, विश्वास पवार, डॉ. भेंडे (मुंबई), डॉ. घाळी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य श्री. उंदरे, प्रा. मगर, प्रा. व्हंडकर व प्रा.गोडघाटे, केआयटी महाविद्यालयाचे प्रा.यादव व प्रा. काटकर, राजारामबापू इन्स्टिट्यूटच्या डॉ. सीमा देसाई, प्रा. अनिकेत परदेशी, प्रा. मुल्ला, अर्जुन थोरात, कमलाकर बुरांडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. राजन पडवळ यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment